आकाश

पृथ्वीवर आधांतरी. खाली पृथ्वी गोल गोल फिरत्ये. ॠतु बदलताय्त. देश बदलताय्त. माणसं बदलताय्त. ऊन आणि सावल्या. आपण आकाशाकडे ध्यान लावून. ते स्थिर आहे. तिकडे काहीच बदलत नाही. निर्विकार. ढगांचे पुंजके लावत, तर कधी दिवस-रात्रीचे रंग फासत, कितीही रुपं बदलली तरी भावांचा अभाव. कोणतही गुरुत्वाकर्षण त्याला शोषु शकत नाही.
सगळ्यांच्या नजरेच्या टप्प्यात पण कोणाच्याही कवेबाहेर. रिक्त... तल्लीन...